समाजाच्या विकासासाठी सकारात्मकता महत्त्वाची भास्कर रामचंद्रजी पालिवाल यांचे प्रतिपादन .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

03/03/2022

समाजाच्या विकासासाठी सकारात्मकता महत्त्वाची भास्कर रामचंद्रजी पालिवाल यांचे प्रतिपादन ....

नाशिक (प्रतिनिधी) :--
   समाजाच्या विकासासाठी सकारात्मकता महत्त्वाची भास्कर रामचंद्रजी पालिवाल यांचे प्रतिपादन  ....
   समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी आपल्यातील सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे. ती नेहमी जवळ बाळगल्यास समाज विकास होतो, असे प्रतिपादन भास्कर रामचंद्रजी पालीवाल यांनी केले. नाशिक येथील पालीवाल महाजन समाजातर्फे ११ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते, या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून भास्कर रामचंद्रजी पालीवाल बोलत होते.
     याप्रसंगी भास्कर रामचंद्रजी पालीवाल पुढे म्हणाले की, आपला पालीवाल महाजन समाज जरी कमी प्रमाणात असला तरी खूप कष्टाळू आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक व्यवसायात पालीवाल समाजातील बांधवांनी आपले नाव नाशिकमध्ये कमविले आहे. समाजबांधवांना सदैव एकमेकांसोबत राहण्याचे त्यांनी आवाहन केले. संकटकाळी आपल्या समाज बांधवांना मदत करण्यासाठी तत्पर रहा, असेही ते म्हणाले. 
    व्यासपीठावर रतनशेठ रामचंद्रजी पालीवाल, भास्कर रामचंद्रजी पालीवाल, चंद्रकांत त्रिभुवनदासजी पालीवाल, अशोक रामचंद्रजी पालीवाल, कैलाशचन्द्र फकिरचंद्रजी पालीवाल, विजयाताई वसंतजी पालीवाल आणि सुधीर द्वारकादासजी पालीवाल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. या वेळी मान्यवरांनी पालीवाल महाजन समाजाची कुलदेवता आशापूर्णा मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण केले, यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी कैलाशचन्‍द्र पालीवाल, अशोक पालीवाल आणि सुधीर पालीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
       #  बालगोपालांनी केले कलागुणांचे प्रदर्शन   #
    या स्नेहसंमेलनात लहानग्यांसाठी आणि महिला वर्गासाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. या कार्यक्रमात बालगोपालांसह मोठ्यांनीही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. 
      #  समाजातील ज्येष्ठांचा यथोचित सन्मान   #
    व्यासपीठावरील उपस्थित ज्येष्ठांना नाशिक पालीवाल महाजन समाजातर्फे शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. पालीवाल महाजन समाजातील अनेक मान्यवरांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमात आलेल्या समाजबांधवांनी आपल्या कुटुंबीयांचा परिचय करून दिला. यानंतर स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण पार पडले. महिला वर्गानेदेखील या कार्यक्रमात आपले भरीव योगदान दिले. 
   कार्यक्रमाच्या शेवटी समारोप करताना आयोजक तुषार भास्कर पालीवाल यांनी स्नेहसंमेलनामागची संकल्पना सविस्तरपणे मांडली. तसेच आगामी वर्षभरात पालीवाल महाजन समाज नाशिकतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे असे आवाहन केले. लवकरच नाशिक पालीवाल महाजन समाजाची पंचकमिटी तथा कार्यकारिणी जाहीर करण्याचेही त्यांनी सांगितले.
    कार्यक्रम संयोजनासाठी दीपक वसंत पालीवाल, प्रमोद अशोक पालीवाल, गिरीश वसंत पालीवाल, धीरज शांतीलाल पालीवाल, आशिष कांतीलाल पालीवाल, अतुल कांतीलाल पालीवाल, अंकित नंदलाल पालीवाल, स्वप्नील अरुण पालीवाल आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री धीरज पालीवाल आणि स्मिता कैलाशचंद्र पालीवाल यांनी केले. स्पर्धांचे सूत्रसंचालन यशिका तुषार पालीवाल आणि स्नेहा दीपक पालीवाल यांनी केले. संमेलनास सर्वश्री कांतीलाल रतनचंद्र पालीवाल, शांतीलाल रतनचंद्र पालीवाल, नंदलाल रतनचंद्र पालीवाल, मधुकर रतनचंद्र पालीवाल, अरुण रतनचंद्र पालीवाल, गोपाल अनिलकुमार पालीवाल, उमेश संतोषकुमार पालीवाल, अक्षय प्रेमकुमार पालीवाल, अभिजित सुधीर पालीवाल, शुभम सुनील पालीवाल आदींसह समाजबांधव महिलावर्ग, बालगोपाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी समाजबांधवांनी सहभोजनाचा आनंद घेतला. कार्यक्रमात करोना नियमावलीचे पालन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp