चोपडा महाविद्यालयात 'नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128 वी जयंती' साजरी - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

23/01/2025

चोपडा महाविद्यालयात 'नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128 वी जयंती' साजरी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा महाविद्यालयात 'नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128 वी जयंती' साजरी

          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्यावतीने 'नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

         सदर कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ.के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर. एम. बागुल, उपप्राचार्य डॉ.ए. बी. सुर्यवंशी तसेच डॉ. डी. एस. पाटील, डॉ. ए. एच. साळुंखे आदि उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

         सदर कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला विभाग प्रमुख डॉ. सी.आर. देवरे  प्रास्ताविक करताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन जहाल मतवादी व्यक्तिमत्वाच्या सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांच्या विरोधात ठामपणे उभे राहून " तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा " तसेच जय हिंद ची घोषणा करत आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांचे स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचे कार्य अफाट आहे'. अशा या महान व्यक्तीस आपल्या प्रास्ताविका मधून अभिवादन केले. यावेळी  परेश पाटील, श्रद्धा वाणी, नंदिनी पाटील व हर्षल चौधरी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

          या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी 'विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये वेळ घालविण्यापेक्षा जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केले तर आपणास जास्तीत जास्त विषयाचे ज्ञान व महापुरुषांबद्दलची माहिती मिळेल व त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळेल', असे मत व्यक्त केले.   

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी.पी.बाविस्कर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पी. आय. जैन, प्रा. सौ. एच. सी देवरे, डॉ.एन. सी. पाटील, प्रा. मिस. भाविका गुजराती, मिस.योगिनी पाटील, श्री.जीवन बागुल यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज