पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा खरा विज्ञानवादी - प्रा. डॉ. सागर धनगर
सी व्ही रामन हे पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय होय. ज्या राष्ट्रांनी शिक्षणात पर्यायाने विज्ञान क्षेत्रात गुंतवणूक केली ते राष्ट्र आज जगात अग्रेसर आहेत. दैनदिन जगण्यातली विज्ञान समजून घेतले पाहिजे. शांत आणि जिज्ञासु मन संशोधनासाठी आवश्यक आहे. पडलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करणाराच खरा विज्ञानवादी होय. म्हणून मुलांना प्रश्न पडले पाहिजे आणि त्यांनी ते विचारले पाहिजे. जागतिक स्तरावरील बदलांसोबत जुळवून घेण्यासाठी शिक्षण आवश्यक असून शिक्षणावर केलेला खर्च हा खर्च नसून ती गुंतवणूक असल्याचे मत फैजपूर महाविद्यालयातील प्रा. डॉ. सागर धनगर (चोपडा) यांनी व्यक्त केले.
येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर मुख्याध्यापक एस. डी. चौधरी, पर्यवेक्षक डी. एस. शुक्ल, ज्येष्ठ शिक्षक एस. बी. पाटील, विज्ञान शिक्षक बी. जी. माळी, सी.पी. चौधरी, ए. आर. महाजन, सौ. शीतल माळी यांची उपस्थिती होती.
विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना डॉ. सागर धनगर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान गीते, नाटिका सादर केल्या. सूत्रसंचालन ए. आर. महाजन यांनी तर प्रास्ताविक सी. पी. चौधरी यांनी आभार प्रदर्शन बी. जी. माळी यांनी केले.

No comments:
Post a Comment