चोपडा (प्रतिनिधी) : - -
झिरो लोडशेडींग बंद करून दुष्काळ जाहीर करावा व चो.सा.का. ने कबूल करून शेतकऱ्यांचे थकीत पैसे न दिल्याने आत्मक्लेश आंदोलनाचे शेतकरी कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन....
डोक्यावर दुष्काळाचे ढग असताना व 75 % हंगाम हातचा गेला असताना वेळीच कृत्रिम पाऊस पाडण्याची विनंती लक्षात न घेतल्याने आज दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कूपनलिका द्वारे थोडेफार येणारे पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असताना वीज मंडलने शेती वीज पंपासाठी झिरो लोड शेडींग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यासाठी भलेही औद्योगिक वीज कमी द्या, पण शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या, म्हणजे किमान खायची तरी सोय होईल तसेच सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेच्या मास्टर परिपत्रक RBI/2015 - 16/68 FIDD. No. FSD. BC.01 /05.10.001/2015-16 July 01, 2015 नुसार तातडीची व इतर मदत द्यावी.तसेच वीज मंडळाने तात्काळ निर्णय न घेतल्यास सोमवार नंतर केव्हाही तालुक्यात विविध ठिकाणी रस्ता रोको करण्यात येतील असे शेतकरी कृती समितीच्या निवेदनात नमूद केले आहे. त्याची प्रत मा.ना. गुलाबराव पाटील (पालकमंत्री) , मा.ना.गिरीश महाजन , मा.ना. अनिल पाटील साहेब (मदत व पुनर्वसन मंत्री) , मा.श्री आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी जळगाव) यांना देण्यात आल्या आहेत.
तसेच शेतकऱ्यांचे 2014 / 15 चे ऊस बिलातील ठेव म्हणून ठेवलेली 150 /- रु. प्रतिटन प्रमाणे रक्कम रु. 3 • 30 कोटी अद्याप न मिळाल्याने कारखान्याचे व्हा चेअरमन एस बी पाटील हे 11 सप्टेंबर 2023 पासून "आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण" करणेबाबत चे देखील निवेदन देण्यात आले.
यावेळी एस बी पाटील, प्रशांत पाटील, कुलदीप राजपूत,भागवत महाजन, प्रा प्रदीप पाटील, जगदीश बोरसे, संतोष पाटील, गुलाब पाटील, बी आर एस पक्षाचे दीपक पाटील हजर होते.
WhatsApp
No comments:
Post a Comment