जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमाचा घोळ हा आंबिया व मृग बहरात अश्या दोघे हंगामात समाविष्ट करून , घोळ लवकर मिटवा - - ना. अनिल पाटील यांना शेतकरी कृती समिती कडून निवेदन... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/10/2023

जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमाचा घोळ हा आंबिया व मृग बहरात अश्या दोघे हंगामात समाविष्ट करून , घोळ लवकर मिटवा - - ना. अनिल पाटील यांना शेतकरी कृती समिती कडून निवेदन...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमाचा घोळ हा आंबिया व मृग बहरात अश्या दोघे हंगामात समाविष्ट करून , घोळ लवकर मिटवा - - ना. अनिल पाटील यांना शेतकरी कृती समिती कडून निवेदन...

         जळगाव जिल्ह्यात शेतकरी आता वर्षभर केळी लावतो व केळी पीक विमा फक्त आंबिया बहारात म्हणजे फक्त ऑक्टोबर मध्येच काढता येतो, यानेच केळी पीक विम्याचे सारे प्रश्न निर्माण झाले.

         आंबिया बहार (कांदे बाग) ऑक्टोबर ते डिसेंबर या शेतकरी कालावधीत लागवड करतात व   ते ही रोप व कंद असे दोन प्रकारे , जे कंद लावतात त्यांना उगवायला किमान एक महिना लागतो. पण पीक विमा काढण्याची मुदत 31 ऑक्टोबर त्या दिवशी शेतात जियो टॅग्गिंग ने फोटो कसा निघेल ? काही शेतकरी लागवड करायची असेल तर आधी पीक विमा भरून ठेवतात, पण चुकून त्यांचे लागवडीचे नियोजन चुकले तर मात्र पैसे वाया जातात व सरकारच्या नजरेत शेतकरी लबाड ठरतो.

 

       31 ऑक्टोबर पूर्वीच आंबिया बहरात लागवड होते हा जावई शोध सरकार व पीक विमा कंपनी ने लावल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमा योजना बाबत लावल्याने शेतकरी व जिल्हा बदनाम होत आहे. सबब केळी लावून देखील पीक विमा काढण्यापासून वंचित ठेवण्याचे धोरण सरकारचे दिसते.

          केळीची आता वर्षभर लागवड केली जाते त्यामुळे तिचा डाळिंब व द्राक्ष या पिका सारखा दोघेही बहरात समावेश करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण खानदेशातील शेतकरी चा लढा कमी पडतो की काय ?अशी शंका शेतकऱ्यांना येते. आंबिया बहरात देखील केळी पीक विमा काढण्याचा कालावधी 31 डिसेंबर पर्यंत वाढवून मिळावा व गेल्या वर्षाच्या थकीत पीक विम्याचा प्रश्न तात्काळ मिटवावा अशी देखील मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

         यावेळी एस बी पाटील, राहुल सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, दिनेश पाटील, पंकज सोनवणे, ॲड कुलदीप पाटील हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp