अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्यास यावे रा. कॉ. शरद पवार पक्षाकडून तहसीलदार यांना निवेदन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/02/2024

अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्यास यावे रा. कॉ. शरद पवार पक्षाकडून तहसीलदार यांना निवेदन

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्यास यावे रा. कॉ. शरद पवार पक्षाकडून तहसीलदार यांना निवेदन 
         चोपडा तालुक्यात काल बेमोसमी पाऊस पडल्यामुळे व मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे, तरी तालुक्यात मुख्य पीक मका , ज्वारी , हरभरा , केळी , दादर व गहू असे पिकं काढणीवर आलेले असतांना रात्री झालेल्या बेमोसमी गारपीटीसह पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वारा आणि वादळ झाल्यामुळे चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास ह्या निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी नायब तहसीलदार आर. आर. महाजन यांना निवेदन दिले.
         चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तलाठी , ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना त्वरित पाच दिवसाच्या आत चोपडा तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करावेत व मेटाकुटीला आलेला शेतकरी राजाला महाराष्ट्र शासनाकडून सर्व शेतकरी बांधवांना भरीव नुकसानीची मदत मिळावी ही विनंती नायब तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सर्व तालुक्याचे व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
          याप्रसंगी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विनायक नाना चव्हाण , माजी जिल्हा परिषद सदस्य डी पी साळुंखे सर , शांताराम आबा सपकाळे , तुकाराम बापू पाटील , सुनील डोंगर पाटील , विशाल गवळी , शेखर पाटील , मच्छिंद्र पाटील , दीपकवानखेडे , अमोल पाटील , माजी नगरसेवक कैलास सोनवणे , मच्छिंद्र पाटील , भाईदास पाटील , भाऊसाहेब साळुंखे , इंद्रजीत पाटील , जिल्हा सरचिटणीस लहुश धनगर , युवक शहराध्यक्ष समाधान माळी , चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp