दोन्ही मंत्री यांनी जाहीर केलेली कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे 4000 कोटी व गेल्या वर्षीचा खरिपाच्या पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळणे बाबत निवेदन.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/06/2024

दोन्ही मंत्री यांनी जाहीर केलेली कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे 4000 कोटी व गेल्या वर्षीचा खरिपाच्या पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळणे बाबत निवेदन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          दोन्ही मंत्री यांनी जाहीर केलेली  कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे 4000 कोटी व गेल्या वर्षीचा खरिपाच्या पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळणे बाबत निवेदन....

        लोकसभा निवडणुकी दरम्यान 25 एप्रिल रोजी जळगाव येथे  मा ना देवेन्द्र फडणवीस व मा.ना.धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यात  निवडणूक संपल्या संपल्या कापूस व सोयाबीन भावांतर योजनेसाठी 4000 कोटी शेतकऱ्यांचे खात्यावर टाकणार असल्याचे सांगितलं होते, ते मंजूर असून फक्त आचारसंहिता असल्याने निवडणूक संपली की लगेच वितरीत होणार असे देखील दोघेही मंत्री म्हणाले पण अद्याप सारे सामसूम दिसत आहे.आपण शब्दाला जागून ते लवकर टाकावे अन्यथा विधान सभा निवडणूक काळात प्रत्येक ठिकाणी शेतकरी आपणास अडवतील व विचारतील.

         तसेच जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी अवकाळी व अतिवृष्टी ने कापूस पिकांसह खरिपातील इतर पिकांचे नुकसान झाले होते. चोपडा तालुक्यात पावसाचा 21 दिवस खंड नसल्याने आगाऊ पीक विमा रक्कम मिळाली नाही पण पीक विमा मिलनेसाठी चे पीक कापणी प्रयोग झालेत त्यात चोपडा तालुक्यात खूप कमी उत्पन्न आल्याचे स्पष्ट अहवाल अधिकाऱ्यांनी दिले आहेत. म्हणजे उंबरठा उत्पन्न कमी आहे तरी देखील अजून पीकविमा अद्याप वाटप झाला नाही, त्याबाबत देखील तत्काळ सरकार पातळीवर आदेश व्हावेत.

          अश्या स्वरूपाचे निवेदन तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी पाटील, भागवत महाजन, डॉ रविंद्र निकम, डॉ सुभाष देसाई, अजित पाटील, कुलदीप राजपूत, प्रशांत पाटील, प्रमोद पाटील,अजय पाटील, प्रवीण पाटील, रफियोद्दिन पिंजारी, मन्साराम महाजन हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp