चोपड्याच्या जन मानवता बहुउद्देशीय संस्थेला मल्हार हेल्प फेअर 4 कडून उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार प्रदान...
मल्हार हेल्प फेअर 4 आयोजित "मुझे ही मिला मेरा भगवान"या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 60 संस्था पैकी उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार व्यसनमुक्ती अभियान आणि कॅन्सर जनजागृती बाबत राज्यात नावलौकिक मिळवणारी व कॅन्सर ग्रस्तांना सदैव मदती साठी सदैव तत्पर असणारी व तंबाखू मुक्त अभियान कसोशीने राबवित असल्याने व तंबाखू मुक्त शाळा अभियानात जळगाव जिल्ह्याला महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर आणणारे व कॅन्सर वर मात करून कॅन्सर ग्रस्तांना जगण्याची प्रेरणा देणारे व कॅन्सर, कॅन्सल होऊ शकते असे कॅन्सरला आव्हान देणारे चोपड्याचे राज मोहम्मद खान शिकलगर यांच्या जन मानवता बहुउद्देशीय संस्थेला उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार सागर पार्क जळगाव येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब ,यांचा शुभ हस्ते त्यांना त्याच्या परिवारा सह प्रदान करण्यात आला.
त्यावेळी महानगरपालिका आयुक्त कुलकर्णी साहेब, माजी खासदार डॉ उल्हास पाटील ,ऍड, ललिता पाटील डॉ केतकी पाटील व मल्हार हेल्प फेअर 4 चे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्हार हेल्प फेअर 4 च्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment