अमळनेर येथे स्वच्छता मोहिमेचा बोजबारा ...
रिकामे प्लॉट घाणीचे माहेरघर ...
मराठा मंगल कार्यालाजवळ व कृषी कार्यालयासमोर रिकामे प्लाट आहेत. जरी कचरा गाडी येत असली तरी लोक तेथे कचरा टाकतात व इतर लोकांना ञास होत असतो. कचरा असल्यामुळे दुर्गधी पण येत असते. रहदारीचा रस्ता असल्यामुळे वर्दळ कायम असते व साने गुरुजी शाळा पण आहे मुले येजा करतात. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो तरी लोकांनी कचरा गाडीत टाकावा.
जेणेकरून इतरांना ञास होणार नाही. आपण जेथे राहतो त्या परिसरात घाण करु नये. कारण त्यांचा ञास आपल्याला होईल तसेचआपले व इतरांचेही आरोग्य खराब होईल कचरा जमा होत राहिल्याने मग तेथे पाणी साचत जात व हळूहळू तो परीसर पूर्णपणे दूषीत बनतो. तरी न. पा. ने लक्ष घालून सदर परिसरात स्वच्छता करावी व पूढे तेथे घाण व कचरा जमा होणार नाही याची दक्षता घ्यावीअशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment