डोलारखेडा वनपाल कार्यालय राम भरोसे? मात्र वरिष्ठांचे दुर्लक्ष?
वनपरिक्षेत्रअधिकारी वडोदा कार्यालय कुऱ्हा काकोडा येथे कार्यालय आहे.वनपरिक्षेत्र वडोदा हे 15000 हेक्टर मध्ये व्यापलेल आहे. विस्तार मोठा असल्याकारणाने कार्यालय जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा कार्यालय चे तीन परिमंडळ वनपाल आहेत.
१) कु-हा काकोडा२)चारठाणा ३)डोलारखेडा येथे आहे.मात्र वनपरिक्षेत्राचेअधिकरी वडोदा कार्यालय कु-हा काकोडा हे शेवटचे टोक असल्यामुळे डोलारखेडा परिमंडळ येथे वनपाल कार्यालयची निर्मिती केलेली आहे परिसरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडता,बरोबर त्याठिकाणी ताबडतोब चार कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह जाणे अत्यंत गरजेचे असते.
या राज्य महामार्ग १९४ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरून वनविभागातील व महसूल जमीन विभागातील, अवैद्य वृक्ष तोड केले सागवान, किंवा अन्य वृक्ष निंब, चिंच अवैद्य वृक्ष तोड करणारे व्यवसाईक लाकडाचे ट्रक चे ट्रक भरून जात असतात आणि मोठ्या वाहनातून सुद्धा व फोर व्हीलर ,थ्री व्हीलर या वाहानातून सातपुडा पर्वतातीलअवैध्य वृक्ष तोड सागवान लाकडा पासून तयार केलेले वस्तू ने तयार केलेले साहित्य डायनिंग टेबल सोफा सेट टेबल खुर्च्या टीव्ही कपाट फर्निचर, दरवाजे खिडक्या अशा अनेक वस्तू व वन्य प्राण्यांचे शिकारीचे मास डिंक अवैद्य उत्खनन मूरूम रेती दगड माती रस्त्यावरून वाहतूक केली जाते म्हणून या प्रकाराला आळा बसेल या दूरदृष्टीने या ठिकाणी शासन स्तरावर वनविभागाने या कार्यालय निर्मिती केली आहे. पुढील प्रमाणे स्टॉप ठेवण्यात आलेला आहे.आणि १)वनपाल २) वनरक्षक १वाचमन पण चार कर्मचारी या ठिकाणी वन विभागाने नियुक्त केलेले आहे.या अगोदर चौधरी वनपाल म्हणून कार्यरत होते व श्री फणसे म्हणून या ठिकाणी कार्यरत होते हे मुख्यालय राहत होते.परंतु श्री.पी.टी. पाटील वनपाल यांची नेमणूक केल्यापासून ते आज पर्यंत या ठिकाणी का राहात नाही त्यांचे निवासस्थान मुक्ताईनगर येथे आहे त्यांचे संपूर्ण काम ते मुक्ताईनगर येथून पाहत असतात.संपूर्ण ऑफिस मधील रेकॉर्ड त्यांच्या मुक्तानगर निवासस्थानावर ठेवलेले असल्याचे समजते वरिष्ठ अधिकारी यांचा राउंड असल्यास किंवा व्हिजीट असल्यास किंवा घटना घडून गेलेली नंतर त्या ठिकाणी येत असतात, आणि सावरा सावरा प्रकरण करुन व लपण्यासाठी इथे काही घटना घडलेली नाही असे दाखवण्यासाठी ते मात्र हजर होत असतात.मात्र त्यांना मुख्यालय राहण्याचे सक्तीचे आदेश असताना सुद्धा ते त्या ठिकाणी राहत नाही.वरिष्ठांना माहित नाही का?मग वरिष्ठांनी त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई केल्याचे दिसून येत नाही. ही व्यक्ती राजकीय राष्ट्रीय पक्षाच्या च्या कार्यकर्त्याचे व पदाधिकाऱ्यांच्या जवळच असल्याचे बोलले जात आहे. म्हणून त्याच्यावर कारवाई होत नसेल? त्यांना संरक्षण देण्या मागचे कारण काय असेल? बऱ्याच वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चक्क ठाण मांडून बसले असावे? यासाठी राज्य शासनाचे परिपत्रक नाही का? केंद्र सरकारचे पण पत्रक नाही का? या बाबी कडे वरिष्ठ अधिकारी का डोळेझाक करत आहे? यांना तर काही यांच्यापासून आर्थिक लोभ असेल का ? असे प्रश्न मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे यांच्या वर विभाग लक्ष देईल का?यावर वन विभाग निर्बंध घालेल का? असे अनेक प्रश्न त्यांच्या विषयी मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.
------------------------------------------------
डोलारखेडा हा परिसर टायगर्स कॉरीडोर वाघाचे वास्तव्य असलेला स्पॉट आहे.जंगलात खाण्यासाठी व पिण्या साठी पाणी नाही विश्रांतीसाठी जागा नसल्यामुडे हे प्राणी नदी काठी हिरवे गार रान असल्यामुळे व गावाच्या दिशेने येत असतात
यांच्या येण्यामुळे गाय म्हशी बकर्या बैल शेतकरी मजूर ही त्यांची शिकार होत असतात संरक्षण देण्याचे काम वन विभागाचं असून सुद्धा कर्मचारी व अधिकारी या बाबी कडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.
------------------------------------------------

No comments:
Post a Comment