अमळनेर पाणीपुरवठा विस्कळीत जलकुंभावर जनतेला विचारण्याची सेवाही ठप्प ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/04/2022

अमळनेर पाणीपुरवठा विस्कळीत जलकुंभावर जनतेला विचारण्याची सेवाही ठप्प ...

अमळनेर (प्रतिनीधी) :-- पंकज पाटील
अमळनेर पाणीपुरवठा विस्वाळात जलकुंभावर जनतेला विचारण्याची सेवाही ठप्प ...
      न.पा. करीत असलेला अमळनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय .याआधी न.पा.ने जलकुंभांवर मोबाईल फोन सेवा दिलेली होती. त्यातील बहुतांश मोबाईल संच गेल्या ४ महिन्यांपासून नादुरुस्त होवून बंद पडले असल्याने नागरिकांना जल कर्मचाऱ्यांला जाब विचारणे अशक्य झाले आहे . पाण्या अभावी रणरणत्या उन्हात अमळनेरची जनता पाणी पाणी करीत आहे . जमेची बाजू अशी की , अमळनेर शहरात अजून तरी वीज भारनियमन नाही .सोमवारचा सहावा दिवसही निघून गेला असला तरी अमळनेर शहराच्या अनेक भागांना नळाचे पाणी मिळू शकले नाही . न.पा. प्रशासन आणि मुख्याधिकारी यांनी पेयजलाच्या ज्वलंत समस्येकडे लक्ष द्यावे.अमळनेर शहरातील जलकुंभां वरील कर्मचारी नागरिकांना धड उत्तरेसुद्धा देत नाहीत ; टाळाटाळ करीत असतात असे कटू अनुभव नागरिकांना येत आहेत . तालुक्यातील तापी नदीच्या कलाली आणि तसेच जळोदचा डोह अशा २ ठिकाणाहून अमळनेर शहराला पाणी पुरवठा  होतो. तेथील भ्रमणध्वनी संच गेले ४ महिन्यांपासून नादुरुस्त होवून पडले आहेत . न.पा.ने ते दुरुस्त कर द्यावेत किंवा संबंधित कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर जाहीर करावेत ; जेणेकरुन नागरिकांना त्यांच्याशी मोबाईलद्वारा थेट संपर्क साधता येऊ शकेल व पाण्याची सद्यस्थिती कळू शकेल अशी मागणी अमळनेर शहरवासी नागरिकांकडून केली जात आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp