जागतिक पर्यावरण दिनी भीषण वास्तव...
अवैध वृक्षतोड जोमात - प्रशासन कोमात... कुंपणच शेत खातय ~ तिथ आम्ही काय करणार
खा. रक्षाताईनी केली कान उघडणी ! ! !
चोपडा तालुक्यात गेल्या अनेक दिवसा पासुन अवैध वृक्षतोड सुरु असून बिनादिक्कत पणे वाहतूकही होते. महसूल व वनविभागाच्या आशीर्वादाने डेरेदार वृक्षांची बेसुमार कत्तल सुरु आहे. याला महसूल व वनविभागातील अधिकाऱ्यांची भ्रष्टाचारी प्रवृत्ती कारणीभूत आहे. यांच्या आशीर्वादाने अवैध वृक्षतोड करून विटभट्टी चालकांना लाकूड पुरविण्याचा अवैध धंदा राजरोस पणे बिनबोभाट सुरु आहे.
तसेच चोपडा - शिरपूर रस्त्यावरील डेरेदार वृक्षाच्या बुंध्याना आग लावून वृक्षांची कत्तल सुरु आहे. तसेच शेतातील व शेताच्या बांधा वरील , रोडाच्या कडेला असलेल्या वृक्षाचीही या भ्रष्टाचारणे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेसुमार कत्तल सुरु आहे. याला लाकूड माफिया व अधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण संबंध कारणीभूत आहेत. अशी चर्चा सुरु आहे.
बिनालाईट व बिनानंबर प्लेटच्या ट्रॅक्टरने अवैध वृक्षतोड केलेल्या लाकडाची चोरटी वाहतूक करत असताना झालेल्या अपघातात निष्पाप युवकाचा बळी गेला त्याचे कोणाला सोय-सुतक नाही अद्यापही यावर कोणतीही कारवाई का झाली नाही याला काय कारण ? कोणी काय सुविधा पुरविली , कोणी काय गिप्ट दिले , कोणी जेवणाचा कशाचा डबा दिला , कोणी पाकीट दिले अशी चर्चा सुरु आहे.
अवैध वृक्षतोड करून त्या लाकडाची राजरोस पणे ताडपत्री किंवा काळे प्लस्टिक झाकून शहरातून वाहतूक होत असते. याला कोणाचा आशीर्वाद आहे. अशीच वृक्षतोड सुरु राहिल्यास या वर्षी चोपडा तालुक्यात 46 ते 47 डिग्री तापमान होते. ते पुढील वर्षात 50 डिग्री झाल्याचे पाहायला मिळेल असे वाटते.
@ खा. रक्षाताई खडसे यांनी सहायक वनसंवरक्षक यांची केली कानउघडणी @
तालुक्यात होत असलेली अवैध वृक्षतोड व शहरातून होत असलेली लाकडाची राजरोस वाहतूक यावर नागरिकांची मागणी व पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत खा. रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून तक्रार केली व त्या नंतर सहायक वनसंवरक्षक यांना फोन करून अवैध वृक्षतोड का होत आहे ? याला आळा का घातला जात नाही ? या कडे दुर्लक्ष का केले जात आहे ? अवैध वृक्षतोडीला तुमचा पाठींबा आहे का ? अवैध वृक्षतोड बंद न झाल्यास मला आंदोलन करावे लागेल अश्या शब्दात सहायक वनसंवरक्षक पी. व्ही. हळपे यांची कानउघडणी केली.
अवैध वृक्षतोड न थांबल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होऊन कडक उन्हाळा व भीषण जल समस्या उभी राहील. जैववीधतेतील असंतुलन अश्या समस्याना सामोरे जाव लागेल. लक्षात ठेवा पृथ्वी हा सजीव सृष्टी साठी असलेला एकमेव ग्रह आहे.
# आताच सावरा - पृथ्वी जपून वापरा ! ! #

No comments:
Post a Comment