Post Top Ad
Responsive Ads Here
29/11/2023
Home
Unlabelled
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास शेतकरी करणार आंदोलन - तहसीलदारांना निवेदन
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास शेतकरी करणार आंदोलन - तहसीलदारांना निवेदन
कापूस लागवडीचे आदेशानेच जून मध्ये शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली, तरी देखील बोंड अळी पडली, शासन गप्प, फक्त 21 दिवस सलग खंड नाही म्हणून पीकविमा चे ट्रिगर लागू नाही. कापूस उशिरा पेरणी केल्याने आज बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस शेतात उभा असून अवकाळीने तो खराब झाला. पीक विमा कंपन्या कडे फोन केले असता पोस्ट हार्वेस्टिंग चे नावाने ते तक्रार घेत नाहीत, अतिवृष्टी नसल्याने सरकार पंचनामा टाळत आहे, अवकाळी त अतिवृष्टी चा काय संबंध ? आता शेतकऱ्यांनी कुठे जावे ? जिल्ह्यात वजनदार तीन तीन मंत्री , त्यात मदत व पुनर्वसन मंत्री तरी शेतकऱ्यांचा पंचनामा होत नसेल तर मदत कशी मिळेल. त्याच्या नुकसानीचा पंचनामा होऊन त्याला मदत मिळणे गरजेचे आहे. तो न झाल्यास शेतकरी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment