जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारावर कार्यवाही न झाल्याने सरपंचांचा 14 एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/03/2026

जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारावर कार्यवाही न झाल्याने सरपंचांचा 14 एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा....

 

धरणगाव (प्रतिनिधी) : - -

          जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारावर कार्यवाही न झाल्याने सरपंचांचा 14 एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा....

        जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित 10 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने झुरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच एस. जी. पाटील यांनी सरकार विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

         याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच संबंधित विभागाला यापूर्वी तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप एस जी पाटील यांनी केला आहे. तक्रारीनुसार, श्री गुलाबराव बाबूराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना स्वतःच्या संबंधित संस्थेला लाभ मिळवून देण्यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. बँकिंग विनियमन अधिनियमाचे उल्लंघन करून ठरावामध्ये फेरफार, कागदपत्रांतील त्रुटी, तसेच आवश्यक परवानग्यांचा अभाव अशा अनेक गंभीर अनियमितता या प्रकरणात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
         तसेच, बँकेच्या लेखापरीक्षण अहवालातही या व्यवहारांबाबत हरकती नोंदविण्यात आल्या असूनही, संबंधित रक्कम वसूल करण्याबाबत अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे एस जी पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सरपंच एस. जी. पाटील यांनी दि. 14 एप्रिल 2026 पासून झुरखेडा शिवारातील त्यांच्या गट क्रमांक 76/3 या शेतात आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

        “आता प्राण गेले तरी चालतील, पण माघार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे. एस जी पाटील यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, सहकार क्षेत्रातील पदांसाठी अपात्र ठरविणे आणि संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करणे या प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या आहेत. या घोषणेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp