चोपडा (प्रतिनिधी) : - -
थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू ; चोपडा नगर परिषदेची धडक कारवाई
चोपडा नगरपरिषद प्रशासनाने थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील बारी वाडा, पाटील गढी, चुनार अळी आणि मल्हारपुरा यांसारख्या प्रमुख भागांमध्ये धडक मोहीम राबवत तब्बल 30 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
व्यावसायिक गाळ्यांवरही सीलची कारवाई
या मोहिमेत केवळ नळ कनेक्शनच नव्हे, तर व्यावसायिक मालमत्तांवरही प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. लायब्ररी शॉपिंग सेंटर आणि छत्रपती शाहू महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एकूण 10 गाळे सील करण्यात आले आहेत. ज्या थकबाकीदारांनी एक दिवसाची मुदत मागितली, त्यांना शेवटची संधी म्हणून वेळ देण्यात आला आहे. 🔹 या कारवाईत सहभागी अधिकारी 🔹
या धडक मोहिमेत उपमुख्याधिकारी संजय मिसर, वरिष्ठ लिपिक अनिल चौधरी, लिपिक चेतन त्रिभुवन, मिळकत व्यवस्थापक महेश जोशी, लिपिक पंकज बाविस्कर, शिपाई गुलाबवाडे आणि मदतनीस मनोहर माळी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
🔴 रामनिवास झंवर, मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांचे आवाहन 🔴
मुख्याधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की "अभय योजनेची अधिकृत मुदत संपलेली असूनही, नागरिकांच्या फायद्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करून ही संधी उपलब्ध करून दिली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात थकबाकीदारांवर यापेक्षा मोठी आणि कठोर कारवाई केली जाईल, आणि तेव्हा कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी त्वरित कर भरणा करावा." @ या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये @
🔹 सुटीच्या दिवशीही सेवा सुरू 🔹
या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही नगर परिषदेचा वसुली विभाग कर भरणा स्वीकारण्यासाठी 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात आला आहे.
🔴 नागरिकांचा मोठा प्रतिसाद 🔴
सध्या वसुली विभागात कर भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असून, लोकांमध्ये 'अभय योजने'चा लाभ घेण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे.
🔹 शेवटची संधी 🔹
योजनेचे आता काहीच दिवस शिल्लक आहेत. दंडमाफीचा लाभ घेऊन सन्मानाने आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment