चोपडा नगरपरिषदेची पाणीपट्टी थकबाकीदारांवर 'नळ कट'ची टांगती तलवार.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

28/03/2026

चोपडा नगरपरिषदेची पाणीपट्टी थकबाकीदारांवर 'नळ कट'ची टांगती तलवार....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा नगरपरिषदेची पाणीपट्टी थकबाकीदारांवर 'नळ कट'ची टांगती तलवार....

         चोपडा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा वाढता खर्च आणि घटलेली वसुली यामुळे नगरपरिषद प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वर्षाकाठी सुमारे 5 कोटी रुपये खर्च होत असताना, प्रत्यक्ष 31 मार्चअखेर वसुली मात्र केवळ 2•1 कोटींच्या घरात आहे. या आर्थिक तफावतीमुळे पाणीपुरवठा व्यवस्था संकटात सापडली असून, मुख्याधिकाऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

         नगरपरिषदेच्या सन 2025-26 च्या विवरण पत्रानुसार वीज बिल, रसायने, देखभाल-दुरुस्ती आणि कर्मचारी वेतनावर मोठा खर्च होत आहे. मात्र अनेक नागरिकांनी गेल्या 5 ते 10 वर्षांपासून पाणीपट्टी भरलेली नाही. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न निम्मेच असल्याने प्रशासनावर मोठा ताण येत आहे. प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारण्याचे निश्चित केले असून त्याअंतर्गत: ज्यांनी विनापरवाना नळ कनेक्शन घेतले आहे, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच मोठ्या थकबाकीदारांच्या नळ जोडण्या तोडून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
         न. पा. कर कमी वसुलीमुळे केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर शहराच्या एकूण विकास कामांवर परिणाम होत आहे. नगरपरिषद संचालनालय (मुंबई) आणि जिल्हाधिकारी (जळगाव) यांच्याकडून वसुली वाढवण्यासाठी मोठा दबाव आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास वित्त आयोगाचा निधी कमी होणार आहे, ज्याचा परिणाम रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधांवर होईल. यामुळे, कामात कसूर करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित आहे.

         "शहराचा पाणीपुरवठा अखंडित ठेवणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असली, तरी त्यासाठी लागणारा खर्च हा पाणीपट्टी वासुलीतूनच भागवला जातो. थकीत पाणीपट्टीमुळे शहराच्या प्रगतीत अडथळा निर्माण होत आहे. तरी सर्व नागरिकांनी 31 मार्चपर्यंत आपली संपूर्ण थकबाकी भरून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल." असे आवाहन न. पा.मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp